-->

MSEB संबधित उपयुक्त माहिती. लाईटबिल जास्त येत आहे ?






वाढती वीज बिलांची आता ग्राहकांनीचं घ्यावी काळजी :


1) मीटर चे रिडींग घेण्यास येणा-या व्यक्तीचे नाव, ID प्रूफ, आणि रिडींग घेतल्या तारखेला त्याची सही घेणे.

2) पुढल्या वेळेस हे रिडींग 30 दिवसांनी घेतले जाते का नाही हाची खात्री करणे.

3) पुढत्या वेळेचे रिडींग 30 दिवसा नंतर घेण्यास आत्यास त्याला रिडींग घेण्यास मनाई करून त्वरित त्याची तक्रार विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याने कडे लेखी करणे,

4)बिल्डिंग सोसायटी असल्यास सेक्रेटरीनी आपल्या बिल्डिंगच्या वॉचमन कडून ह्या गोष्टी करावयास लावाव्यात. 100 रिडींग पर्यंत 3.76 रुपये प्रति युनिट आहे. परंतु रिडींग 30 दिवसा नंतर घेतल्या मुळे रिडींग 100 च्या वर रिडींग गेल्यास हेच दर दुप्पट म्हणजेच 7.21 रुपये प्रति युनिट आहे. 300 च्या वर रिडींग गेल्यास दर तिप्पट 9.95 रुपये प्रति युनिट आहे. 500 च्या वर रिडींग गेल्यास चौपट 11.31 रूपये प्रति युनिट आहे. आपल्याला येणारे वाढीव बिल हे वरील एकमेव कारणाने येत आहेत, आमच्या विद्युत महामंडळाच्या कर्मचार्यामुळे सामान्य

जनतेस भुर्दंड भरावयास तागत आहे. तरी आपण सर्वांनी वरील गोष्टी कटाक्षाने पळून आमच्या कर्मचा-यांना वठणीस आणाव ही विनंती आपली - महाराष्ट्र वीज वितरण महामंडळ,



महावितरण तथा वीज मंडळाचे धोरणाविषयी जास्तीत जास्त विज ग्राहकांना हि माहिती पोहोचली पाहिजे ९९% ग्राहकांना हि माहिती माहित नाही:


1) वीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३०

दिवसात मिळते ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु.भरपाई ग्राहकास मिळते.

2) ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे.- तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु.५०

भरपाई ग्राहकास मिळते.

3) ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे विज कायदा ५५ सेक्शन व परि.क्र.१७३११ दि. ७/६/२००५.

4) सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता (मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे-ग्रा.सं. कायदा १९८३. परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई-प्रती आठवडा रु.१००

५) थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५,

६) वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो तीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो)

७) नवीन वीज कनेक्शनला तागणारे पैसे घरगुती रु.१५००ते रु.२००० व क्रुषी पंप रु. ५००० पोल, वायर, केबल, ई.खर्च वीज कंपनिचाच असतो.

८) खेड्यात (शिवारात ) शेतात रात्री घरात वीज असणे अनिवार्य-वीज वियमक आयोग आदेश त्यानुसार चौथा (४) योजना चालु

९) शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई (भाड) मिळते- विज कायदा २००३ व लायसेस रुल २००५ (मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी विहित भरपाई देण्यास सक्षम अधिकारी)

१०) शाळा/कॉलेज/ हॉस्पिटल ई. वीज दर कमीअल जादा दर कमी करून मिळतो M.E.R.C.आदेश केस क्र. १९/२०१२ ( माहे अगस्ट २०१२ पासून फरक परत मिळतो, के.परि.क्र.१७५ दि. ५/९/२०१२ निर्णय दि. १६/८/२०१२) ११. बैल, मनुष्य, गाय इ. वीजेच्या शॉकने जखमी / मेल्यास त्याची संपुर्ण भरपाई वीज कंपनिने द्यावयाची (मनुष्यहानी रु. ५ लाख भरपाई आपली काहीही वीज बिलासबंदी तक्रार असल्यास खालील दूरध्वनी वर सम्पर्क साधावा ! अखिल भारतिय उपभोक्ता (ग्राहक ) प्रतिबंध न्यायमंच महाराष्ट्र राज्य मो. 18002333435



सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, त्यात नवीन सुधारणा होत असतात. परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अधिवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close