-->

अनाथपण वाट्याला आल्याने ती झाली…हजारो अनाथांची माऊली सिंधुताई सपकाळ


सिंधुताई सपकाळ ह्या एक भारतीय समाजसुधारक आहेत. त्यांना “अनाथांची आई” म्हणून ओळखले जाते. भारतातील अनके अनाथ मुलांचे पालन पोषण त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे केले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.

सन २०१६ मध्ये, सिंधुताईंना सामाजिक कार्यासाठी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चतर्फे साहित्यात डॉक्टरेट पदवी देण्यात आली.

भारतातील स्त्रियांना जीवन जगणे म्हणजे खूपच कठीण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत त्यांना समाजातील अडचनींना सामोरे जावे लागते. त्यांना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागते. असेच एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे आहे.

सिंधुताई सपकाळ यांचे जीवनचरित्र :-

पूर्ण नाव       : सिंधुताई सपकाळ

अन्य नाव      : अनाथांची आई

जन्म             : १४ नोव्हेंबर १९४८

जन्मस्थान     : वर्धा, महाराष्ट्र, भारत

वय               : ७१ वर्षे २०२० पर्यंत


सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती :-

समाजसुधारक सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात गुरेढोरे पाळणाऱ्या गरीब कुटुंबात झाला. एका गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना चिंदीचे कपडे घालावे लागत होते.

सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे होते. त्यांचे वडील सिंधुताईंचे शिक्षण घेण्यास उत्सुक होते. सिंधुताईचे वडील त्यांना गुरे चारण्याच्या निमित्ताने बाहेर शाळेत पाठवत असत.

आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. आर्थिक परिस्थिती, लहान वयात घरातल्या जबाबदाऱ्या आणि बालविवाहामुळे त्यांना चौथीपर्यंत शिकता आले आणि नंतर त्यांना शाळा सोडावी लागली.


सिंधुताईंचे कुटुंब आणि सुरुवातीचे जीवन :-

सिंधुताईं सपकाळ यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी वर्धा जिल्ह्यात झाला. लग्नानंतर त्यांना खूप कठीण जीवनाचा सामना करावा लागला परंतु त्यांनी आशा गमावली नाही.

त्यांच्या माहेरी त्यांनी महिलांच्या शोषणाविरूद्ध लढा दिला जे वन विभाग आणि जमीनदारांसाठी शेण गोळा करण्यासाठी वापरत होते. यामुळे त्यांचे जीवन अजून कठीण झाले.

या लढाईनंतर त्यांचे आयुष्य अधिक कठीण होईल हे त्यांना माहित नव्हते. वयाच्या २० व्या वर्षी जेव्हा त्या गरोदर राहिल्या, तेव्हा एका चिडलेल्या जमीनदाराने कपट मनाने घृणास्पद अफवा पसरविली कि हे मूल दुसर्‍याचे आहे.

त्यामुळे नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, त्यामुळे नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांना गावाबाहेर काढले.

त्याच रात्री सिंधुताईला अतिशय निराश जनक आणि मोठा धक्का बसला होता, त्यांनी एका गाईच्या गोट्यामध्ये मुलीला जन्म दिला. एकीकडे त्यांनी आपल्या वडिलोपार्जित घरी जाण्यासाठी त्यांनी धडपड केली, परंतु त्यांच्या आईनेही त्यांना नकार दिला.

सिंधुताईंनी आपल्या गरजा भागवण्यासाठी रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकांवर भीक मागितली. त्यांचे अतिशय संघर्षमय जीवन हे स्वतःचे आणि मुलीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होते.

जगण्याच्या या संघर्षमय प्रवासात सिंधुताई महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात चिकलदारा येथे आल्या. येथे वाघ संरक्षण प्रकल्पामुळे ८४ आदिवासी गावे रिकामी करण्यात आली. त्यामुळे सिंधुताईंनी असहाय आदिवासी ग्रामस्थांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना वनमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्यांना पर्यायी पुनर्वसनासाठी योग्य ती व्यवस्था केली.

त्यानंतर सिंधुताई आपल्या मुलीसोबत रेल्वे स्थानकात राहू लागल्या. पोट भरण्यासाठी भीक मागणे आणि स्वत: ला आणि मुलीला रात्री सुरक्षित ठेवण्यासाठी स्मशानभूमीत राहत असे.

आपल्या या संघर्षमय काळात त्यांना समजले की देशात अशी अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरविले की जो कोणी अनाथ त्यांच्या कडे येईल, त्यांची आई म्हणून संभाळ करेन.

त्यांनी स्वतःची मुलगी ‘श्री दगडूशेठ हलवाई, पुणे, महाराष्ट्र’ ट्रस्टला दत्तक दिली, कारण त्या सर्व अनाथ मुलांच्या आई बनू शकेल.

बरीच वर्षे अथक परिश्रमानंतर सिंधुताईंनी चिकलदरा येथे पहिले आश्रम बांधले. त्यांनी आश्रमशाळांसाठी पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी बरीच शहरे आणि गावे भेट दिली. आतापर्यंत, त्यांनी १२०० मुलांना दत्तक घेतले आहे, जे प्रेमाने त्यांना ‘माई’ म्हणून संबोधतात. त्यापैकी बरेच लोक आता प्रतिष्ठित ठिकाणी डॉक्टर आणि वकील म्हणून काम करत आहेत.

जे सत्य सुंदर सर्वथा…आजन्म त्याचा ध्यास दे…

या ओळींप्रमाणे सिंधूताईंच्या आयुष्याची वाटचाल आपल्या दृष्टीस पडते. पण आज जरी या वाटेवर फुलांचा मखमली सडा बघणाऱ्यांना दिसत असला तरी या पावलांना काटेरी पायवाट तुडवावी लागली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जेमतेम 15 महिन्यांचा कालावधी लोटला असेल, 14 नोव्हेंबर 1948 ला आपला देश पंडित नेहरूंचा जन्मदिन “बालदिन” म्हणून साजरा करत होता. आणि त्याच सुमारास वर्धा जिल्ह्यातील नवरगावी गुरे चारणाऱ्या अभिराम साठेंच्या घरात कन्या जन्माला आली.

आयुष्य सुरु झालं खरं पण लाडकी लेक म्हणून नव्हे तर ‘नकोशी’ म्हणून. हे बाळ घरात कधी कौतुकाचा विषय ठरलं नाही. मुलगी म्हणून कायम हेळसांड आणि दुर्लक्ष तिच्या वाट्याला आलं. ती त्यातही समाधानी होती, काही तक्रार म्हणून नव्हती आणि असती तरी कुणाकडे केली असती.

‘चिंधी’ ते ‘अनाथांची माय’ इथंवरचा सिंधुताई सपकाळ यांचा संघर्षमयी प्रवास



सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाची कहाणी :-

नाव ठेवलं गेलं ‘चिंधी’ (कापडाचा फाटलेला तुकडा) . चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीच्या चिंधीला शिक्षणाची भारी आवड! वडिलांच्या प्रेमामुळे जेमतेम 4 थी पर्यंत तिला शिक्षण घेता आलं. गुरे चरायला गेल्यावर लहानशी चिंधी संधी साधत शाळेत जाऊन बसे. तिच्या वडीलांना तिला शिकविण्याची इच्छा होती, परंतु आईचा दुसवास आणि अवहेलना झेलत लहानशी चिंधी कुठपर्यंत मजल मारणार?

जेमतेम 11 वर्षांची असेल तेव्हा चक्क 30 वर्षाच्या श्रीहरी सपकाळ नावाच्या इसमाशी तिचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर काही दिवसातच एकभूत आधार असलेलं वडिलांचं छत्र देखील काळाने हिरावून घेतलं. लहानपणीच लग्न झाल्यावर खेळण्या बागडण्याच्या वयात ती कोवळी पोर तीन लेकरांची आई झाली होती. गावातील इतर स्त्रियांप्रमाणेच चिंधीचं जगणं देखील शोषण आणि अपमानाने भरलेलं होतं पण तिच्यात एक वेगळेपण होतं, ते म्हणजे तिच्यातील आत्मविश्वास आणि चार चौघात आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याची निर्भीडता तिच्यात ठासून भरलेली होती.

गावातील जनावरांचे शेण उचलण्याचा मोबदला मिळविण्याकरता ताईंनी पहिलं बंड पुकारलं. गावातल्या स्त्रियांना न्याय मिळवून दिला. ताईंचा विजय झाला पण गावातल्या जमीनदाराचा अहंकार दुखावला. झालेल्या अपमानाचा त्याला सूड घ्यायचा होता, त्यावेळी चिंधी नऊ महिन्यांची गर्भवती होती, सावकाराने तिच्या पोटातील मूल त्याचे असल्याचे सांगत तिच्या नवऱ्याचे कान भरले.

चिंधीचा नवरा देखील सावकाराच्या सांगण्यात आला आणि चिंधीला बेदम मारहाण करून गोठ्यात फेकून दिले. अर्धमेल्या अवस्थेत चिंधीने गोठ्यातच एका मुलीला जन्म दिला, एकाकी पडलेल्या चिंधीला काहीही सुचत नव्हते. बाळाची नाळ कापण्यासाठी जवळ पडलेला दगड उचलून त्यावर वर केले आणि नाळ कापली.

एका कार्यक्रमा प्रसंगी सिंधुताई म्हणतात-

“मला आज देखील आठवतंय, मी त्या नाळेवर दगडाचे सोळा वार केले तेंव्हा ती नाळ कापल्या गेली होती.”

त्यानंतर तिने त्या मुलीला नदीच्या थंड पाण्याने स्वच्छ केलं आणि तिला घेऊन आपल्या विधवा आईचं घर गाठलं. समाजाच्या धाकाने आईने चिंधीला घरातून बाहेर काढलं. निराधार झालेली चिंधी दहा दिवसांच्या चिमुकलीला घेऊन जीव देण्यासाठी निघाली, वाटेत तिला पाण्याकरता तळमळत असलेला भिकारी दिसला. त्याला चिंधीने पाणी पाजलं जवळचा भाकर तुकडा दिला. त्या भिकाऱ्याला थोडी तरतरी आली.

या प्रसंगानं तीचं मन बदललं… हे दुसरं जीवन अनाथांना आश्रय देण्याकरता मिळालंय असं तिला वाटून गेलं. पुढे मुलीला घेऊन ती बस मध्ये चढायला गेली असता कंडक्टरने तिकीटा करता पैसे नसल्याने तिला चढू दिले नाही. खूप गयावया केल्यानंतर देखील त्याने तिला हाकलून लावले. बस थोडी पुढे जात नाही तोच त्या बस वर आभाळातून कडकडत वीज कोसळली.

चिंधी करता हा पुनर्जन्म होता. तिच्याकरता आता चिंधीचे काही अस्तित्व उरले नव्हते. ती आता “सिंधू” झाली होती…ती नदी जिच्याविषयी ती लहानपणा पासून ऐकत आली होती. ती सिंधू जी वाहतांना लोकांच्या आयुष्यात शीतलता प्रदान करते.

अनाथांचे जीणे जगता-जगता सिंधुताई अनाथांची माय झाली, आपल्यासारख्या निराधार अनाथांना गोळा करत माईंनी भिक मागून त्यांची पोटं भरली. परभणी नांदेड मनमाड या रेल्वेस्थानकांवर माई दिवसभर भिक मागायच्या आणि रात्री झोपायला स्मशानात जायच्या.

सिंधुताई सांगताना सांगतात कि ज्यावेळी त्यांना भिक मिळायची नाही त्यावेळी त्या स्मशानातील जळणाऱ्या चितेवर भाकरी भाजून खायच्या. अश्या प्रकारे स्मशानातील जळणाऱ्या चितेच्या उष्णतेत त्यांनी स्वतःच जीवन सावरलं. रात्री-अपरात्री देखील माई रेल्वे स्थानकांवर एकट्या जाऊन अनाथ मुलांना पदराखाली घेत मायेची सावली द्यायच्या. एक एक रस्त्यावरचं मुल ताई आपलसं करत गेल्या आणि आज जवळ-जवळ 2000 पेक्षा जास्त मुलांच्या सिंधुताई आई झाल्या आहेत.

सिंधुताई देवाकडे मागणं मागतांना म्हणतात :

“देवा आम्हाला हसायला शिकव

परंतु आम्ही कधी रडलो होतो.

याचा विसर पडू देऊ नकोस.”

सिंधुताई या दरम्यान आदिवासींच्या हक्कासाठी देखील लढल्या. एक वेळेला तर आदिवासींच्या मागण्यांसाठी त्या प्रधानमंत्री इंदिरा गांधींपर्यंत देखील पोहोचल्या होत्या. हळूहळू लोक सिंधूताईंना “माई” म्हणून ओळखू लागले आणि स्वतःहून पुढे येऊन त्यांनी स्वीकारलेल्या अनाथ मुलांना दान देऊ लागले.

आता या मुलांना देखील हक्काचे घर मिळाले होते. हळूहळू सिंधुताई इतर अनेक मुलांच्या “माई” झाल्या. सिंधू ताईंना वाटायचे की पोटच्या मुलीच्या प्रेमामुळे इतर मुलांवर अन्याय व्हायला नको म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे पालकत्व पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या संस्थापकांना देऊ केले. त्यांची मुलगी ममता देखील समंजस आणि आईच्या भावना जाणणारी होती. आईच्या प्रत्येक निर्णयात तिने आईला साथ दिली.

सिंधुताई सपकाळ यांची माहिती :-

सिंधूताईंचे वक्तृत्व उत्तम असल्याने हळूहळू त्यांची भजनं आणि भाषणं फार प्रसिद्ध होऊ लागली. त्यांच्या भाषणाच्या प्रसिद्धीमुळे त्यांना 2009 साली अमेरिकेतून देखील बोलावणे आले होते.

आपल्या अनाथांच्या संस्थेसाठी ताई विदेशात देखील जाऊन आल्या आहेत.

वयाच्या 80 व्या वर्षी त्यांच्या पतीने त्यांच्याजवळ येऊन राहण्याचा आग्रह धरला असता ताईंनी आपल्या मुलाच्या रुपात त्यांना स्वीकारलं. आणि म्हणाल्या “आता माझ्यात केवळ आईपण उरलंय बाईपण नाही”

आज सिंधूताईंना 2000 पेक्षा जास्त मुलं आहेत. त्यातील काही वकील, कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर तर कुणी समाजसेवक देखील आहेत. त्यांचा एक मुलगा तर सिंधूताईवरच PHD करतोय.

त्यांची कन्या ममता या आपल्या आईप्रमाणेच ‘ममता बाल सदन’ नावाचे अनाथ आश्रम चालवतायेत.

आपल्या मुलीचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला आणि गाईनीच तिचं रक्षण केलंय या भावनेने सिंधूताईंनी वर्धा जिल्ह्यातील नवरगावी ‘गोपिका गाय रक्षण केंद्र’ सुरु केलं. या गोरक्षण संस्थेत आज जवळ-जवळ 200 गायींना संरक्षण मिळालंय.

पुण्यातील हडपसर भागात असलेली ताईंच्या ‘सन्मती बाल निकेतन संस्थेत’ अनेक अनाथ मुलांना आश्रय मिळाला आहे. त्यांची काळजी घेण्याकरता ताईच्या 20 मुलांना नियुक्त करण्यात आलं आहे.

चीखलदरा इथे मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह‘ निर्माण करण्यात आले आहे शिवाय वर्धा येथे आपल्या वडिलांच्या नावाने ‘अभिराम बाल भवन‘ ची स्थापना केलीये.

सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट :-

750 पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सिंधूताईंच्या जीवनाने निर्माता-दिग्दर्शक अनंत महादेवन एवढे प्रभावित झाले की त्यांनी माई वर आधारीत “मी सिंधुताई सपकाळ” नावाचा चित्रपट तयार केला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. 54 व्या लंडन फिल्म फेस्टिवल मध्ये देखील हा चित्रपट दाखवण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त त्यांच्यावरील पुस्तक ‘मी वनवासी’ आणि एक डॉक्युमेंट्री फिल्म ‘अनाथांची यशोदा’ देखील तयार करण्यात आली.

कवितांची आवड असलेल्या सिंधूताई म्हणतात…

“लकीर की फकीर हुं मै, उसका कोई गम नही,

नही धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नही!”




सिंधुताई सपकाळ यांचे कार्य, भूमिका:-

कार्यक्षेत्र     : सामाजिक कार्यकर्त्या

मुख्य काम  : अनाथ मुलांचे पालन पोषण

ज्ञात भाषा  मराठी

पुरस्कार    : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

धर्म           : हिंदू

राष्ट्रीयत्व    : भारतीय


सिंधुताई एक आदर्श म्हणून...

सिंधुताई सपकाळ यांची प्रेरक जीवन कथा नशिब आणि दृढनिश्चय याबद्दल आहे.

आपल्या जीवनामध्ये अडचणी कशा निर्माण होऊ शकतात हे त्यांनी उल्लेखनीयपणे दाखवून दिले आहे.

स्वतंत्र भारतात जन्मल्यानंतरही भारतीय समाजात उपस्थित सामाजिक अत्याचारांना त्या बळी पडल्या. आपल्या जीवनाचे धडे घेत त्यांनी महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम बनवले, त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्‍या संस्थांनी असहाय आणि बेघर महिलांना मदत केली.

आपले अनाथाश्रम चालविण्यासाठी सिंधुताईंनी पैशासाठी कुणापुढे हात कधीच पसरवले नाहीत, त्याऐवजी त्यांनी सार्वजनिक व्यासपीठांतून प्रेरणादायी भाषणे केली आणि समाजातील वंचितांना व उपेक्षित वर्गांना मदत करण्यासाठी जनतेचा पाठिंबा मागितला.

त्यांची आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या मुलांसह राहणे, त्यांचे स्वप्न साकार करणे आणि त्यांना आयुष्यात स्थायिक करणे.

सिंधुताई संचलित संस्था

बाल निकेतन हडपसर ,पुणे

सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा

अभिमान बाल भवन , वर्धा

गोपिका गाईरक्षण केंद्र , वर्धा ( गोपालन)

ममता बाल सदन, सासवड

सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे


सिंधुताईंच्या जीवनावरील चित्रपट :-

अनंत महादेवनचा २०१० मधील मराठी चित्रपट “मी सिंधुताई सपकाळ” हा सिंधुताई सपकाळ यांच्या खर्‍या कथेने प्रेरित एक बायोपिक आहे. ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती.

पुरस्कार व गौरव

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही :-

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)

पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (२०१२)

महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (२०१०)

मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)

सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार

राजाई पुरस्कार

शिवलीला महिला गौरव पुरस्कार.

श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (१९९२)

सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (२०१२).

२००८ – दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’.

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)

पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’





Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close